औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकत घवघवीत यश मिळावल्याने औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आझाद चौक ते बुढीलाईन येथील पक्षाचे कार्यालय दारुस्ससलामपर्यंत रॅली काढली. सीमांचलने `धपा धप दिया`, अशा शब्दांत खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल ट्विट केले.
एमआयएमने सीमांचल भागातील २१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवलेल्या या पक्षाने यावेळी मात्र जोरदार मुंसडी मारत पाच जागा जिंकल्या आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी तब्बल दोन आठवडे प्रचार केला होता.
यशाबद्दल इम्तियाज जलील म्हणाले, की सीमांचल भागात एमआयएमने २१ जागांवर उमेदवार दिले होते. या शिवाय बसपा आणि अन्य पक्षाची आमची आघाडीदेखील होती. गेल्यावेळी पोटनिवडणुकीत आम्ही एक जागा जिंकलो होतो, आता पाच जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.