file Photo
file Photo 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी तब्बल नव्वद हजारांची ‘वेटिंग’ !

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccination) तुटवडा कायम असल्याने शहरातील दुसऱ्या लसीसाठी वेटिंगवर असलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी (ता.२२) महापालिकेला सात हजार लसी मिळाल्या होत्या. असे असले तरी दुसऱ्या डोससाठी अद्याप सुमारे ९० हजार नागरिक वेटिंगवर आहेत. दरम्यान, गुरुवारी ३९ केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. नागरिकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अवघ्या चार तासांत लस संपली. कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या महिन्यापासून तुटवडा आहे. महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) आठवड्यासाठी पाच-दहा हजार लसी मिळत आहेत. त्यामुळे लस उपलब्ध होताच लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत. महापालिकेला गुरुवारी पाच दिवसानंतर सात हजार लसी मिळाल्या. त्यानुसार ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.(nineteen thousand people awaits second dose of corona vaccination in aurangabad glp88)

त्यात दुसऱ्या डोससाठी ३४ केंद्रे ठेवण्यात आले होते. लस आल्याची माहिती मिळताच सकाळपासून कुपन घेण्यासाठी (Corona) गर्दी केली. प्रत्येक केंद्राला दीडशे लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे अवघ्या चार तासात लस संपली. पहिला डोस घेण्यासाठी को-विन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना पाच केंद्रावर लस देण्यात आली. दिवसभरात सुमारे सहा हजार आठशे लस संपल्या. त्यामुळे शुक्रवारी (ता.२३) शिल्लक लसीतून लसीकरण केले जाईल. त्यासाठी एखादे केंद्र सुरू ठेवले जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT