प्रकाश आंबेडकर.jpg
प्रकाश आंबेडकर.jpg 
छत्रपती संभाजीनगर

आता लॉकडाऊन मान्य नाही; पुर्वीप्रमाणे जगण्यासाठी लोकांनी बाहेर पडावे : प्रकाश आंबेडकर 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : लॉकडाऊनला आता आमचा पाठिंबा नाही, राखी पौर्णिमेच्या दिवशी लोकांनी आता आम्हाला लॉकडाऊन नको असे मानून आपापल्या घरावर, गॅलरीत तुम्ही ज्या झेंड्याला मानत असाल किंवा राष्ट्राचा तिरंगा झेंडा लावावा. आणि कोरोनाला आम्ही हरविले आहे. आम्हाला लॉकडाऊन पुर्वीचे जनजीवन जगू द्या, असा संदेश सरकारला द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवत आता लोकांनी आपले जनजीवन पुर्वीसारखे सुरळीत करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले. 

आंबेडकर म्हणाले, कोरोनामुळे चार महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम भयंकर आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ पाच टक्के लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत त्यांना सर्व प्रकारचे उपचार दिले पाहिजेत. पण त्यासाठी ९५ टक्के नागरिकांना का वेठीस धरले जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार लॉकडाऊनच्या चक्रामध्ये अडकले आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आता जनतेनेच सरकारला मार्ग दाखवावा.

उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो, जशी ईद ते आधी साजरी करत होते, तशीच आताही साजरी करावी. तीन तारखेला राखी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे सरकारने आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करून लोकांना सण साजरे करू द्यावेत. रिक्षा, दुकाने, टपऱ्या बस अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था आता पहिल्या प्रमाणे निर्माण व्हायला पाहिजेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
म्हणून लॉकडाऊनला पाठींबा नाही 
लाकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. ती रुळावर आणण्याची जबादारी सरकारची नाही, तर लोकांचीच आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन पाळू नका, दुकाने, व्यवहार, उद्योग सुरू करा. स्वतःला वाचवण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करून जनजीवन सुरळीत करावेच लागेल. म्हणून आमचा लॉकडाऊनला यापुढे पाठिंबा असणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

(संपादन- प्रताप अवचार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT