corona vacine
corona vacine sakal
छत्रपती संभाजीनगर

लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार ३४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल एक हजार ७५ जणांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वीस दिवसांत सुमारे सहा हजार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान अनेकांना तीव्र लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वॉररूममधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी दिवसांतून तीनवेळा संपर्क साधला जात असून, त्यासाठी वॉररूममध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या तीन हजार ३४० रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यात लस घेतली आहे का? असा प्रश्‍नही रुग्णांना करण्यात आला असता दोन हजार ४४ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले तर लसीचा एक डोस घेतलेला आहे, असे २२१ जणांनी सांगितले. एक हजार ७५ जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे सांगितले.

लस घेतलेल्यांना धोका कमी

यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला तरी अशांना जास्त त्रास होत नाही. मात्र लस घेतलेली नसेल तर धोका अधिक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT