Wedding 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये लग्न कार्यासाठी लागणार महापालिकेची परवानगी, विना परवानगी समारंभाचे आयोजन केल्यास थेट गुन्हा

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. पण प्रत्येक मंगल कार्यालयात शासन नियमांना बगल देत शेकडो जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, वऱ्हाडींनी मास्क वापरले नाही तर कार्यालयच सील करण्याचा इशारा देण्यात आला होता. आता लग्न कार्यासाठी महापालिकेची व पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. विना परवानगी सोहळा घेतला तर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.


दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात शासनाने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमिवर महापालिकेने कोरोना संदर्भातील निर्णयांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याची तंबी दिली होती. दरम्यान दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार श्री. पांडेय यांनी लग्नकार्याच्या संदर्भात आदेश काढले असून हे आदेश एक डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी बंदी कायम ठेवण्यात आली आहे. लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादाच कायम आहे. संबंधितांतना महापालिकेची आणि पोलीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पहिल्यांदा ५५० रुपये दंड, नंतर लावणार सील
संभारंभात सहभागी होणाऱ्याला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार. सोहळ्यात कोणी विनामास्क आढळले तर मंगल कार्यालय चालकाला पहिल्यावेळी पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यानंतर असाच प्रकार घडला तर मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाणार आहे व नंतर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT