Politics In Auranngabad APMC about Development Works Marathi News 
छत्रपती संभाजीनगर

बाजार समितीत सुरू झाले विकासकामांवरून राजकारण

प्रकाश बनकर

औरंगाबाद : बाजार समितीत अडीच वर्षांनंतर पुन्हा भाजप-काँग्रेसचे राजकारण रंगू लागले आहे. ५ ऑगस्टला बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर समितीचा कारभार आता प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे.

भाजप मुदतवाढीसाठी न्यायालयात गेले तर काँग्रेसने प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. भाजप अडीच वर्षांत केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे, तर काँग्रेसकडून काही कामे बंद पाडण्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येत आहे. 

बाजार समितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आरोप-प्रत्यारोपांसह प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न काही संचालकांतर्फे केला गेल्याचा प्रकारही घडला आहे. एवढेच नव्हे, तर आता कोणतीही निवडणूक नसताना बाजार समितीत काँग्रेस व भाजप आपआपली ताकत दाखवत आहेत.

गेल्या अडीच वर्षात बाजार समितीचे रूप पालटले आहे. करमाड येथील उपबाजारपेठही आधुनिकरीत्या उभारण्यात आली आहे. यात गेल्या संचालक मंडळाच्या काळात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते.

माजी खासदार चंद्रकांत खैरे व विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनीही एकमेकांवर आरोप केले होते. आता प्रशासक येण्यापूर्वी ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या धनादेशावरून भाजप आणि काँग्रेस संचालकांचा गोंधळ झाल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर रस्त्याच्या कामातही काही संचालकांनी अडथळा आणला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT