व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी २२ अर्ज sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी २२ अर्ज

निवडणुकीची रणधुमाळी सुरु; रविवारी निवडला जाईल नवीन अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरला अध्यक्षांसह नवीन कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी(ता.१७) अध्यक्ष, महासचिवासह ९ पदासाठी २२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पहिल्यांदाच होणारी निवडणूकी चांगली रंगतदार होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली महासंघाची आतापर्यंत सर्व निवडणूकाबिनविरोध झाल्या असून यंदाही ही परंपरा कायम राहावी, यासाठी काही ज्येष्ठ प्रयत्नशील असल्याचे समजते.

दर तीन वर्षांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, महासचिव यांच्यासह कार्यकारणीची निवड केली जाते. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपला होता. परंतू करोनाच्या संकटामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ काळे व सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी नुतन कार्यकारणी निवडीसाठी निवडणूककार्यक्रम घोषित केला आहे. यात ९ ते १३ ऑक्टोबरपर्यंत नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली, असून बुधवारी (१७ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस होता. दरम्यान सायंकाळ अखेरपर्यंत अध्यक्ष, महासचिव, उपाध्यक्ष यासह नऊ पदासाठी एकूण २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी (ता.१८) आलेल्या अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल तर अर्ज मागे घेण्याचीमुदत २० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT