व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी २२ अर्ज sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी २२ अर्ज

निवडणुकीची रणधुमाळी सुरु; रविवारी निवडला जाईल नवीन अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरला अध्यक्षांसह नवीन कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी(ता.१७) अध्यक्ष, महासचिवासह ९ पदासाठी २२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पहिल्यांदाच होणारी निवडणूकी चांगली रंगतदार होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली महासंघाची आतापर्यंत सर्व निवडणूकाबिनविरोध झाल्या असून यंदाही ही परंपरा कायम राहावी, यासाठी काही ज्येष्ठ प्रयत्नशील असल्याचे समजते.

दर तीन वर्षांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, महासचिव यांच्यासह कार्यकारणीची निवड केली जाते. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपला होता. परंतू करोनाच्या संकटामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ काळे व सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी नुतन कार्यकारणी निवडीसाठी निवडणूककार्यक्रम घोषित केला आहे. यात ९ ते १३ ऑक्टोबरपर्यंत नवीन सदस्य नोंदणी करण्यात आली, असून बुधवारी (१७ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस होता. दरम्यान सायंकाळ अखेरपर्यंत अध्यक्ष, महासचिव, उपाध्यक्ष यासह नऊ पदासाठी एकूण २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी (ता.१८) आलेल्या अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल तर अर्ज मागे घेण्याचीमुदत २० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

Explained: तीन वर्षांत भारताचे तीन शेजारी पेटले! काय आहे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेतील अस्थिरतेची कहाणी? भारतावर काय परिणाम?

Beed News : अशोक थोरात यांचे निलंबन रद्द; राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक म्हणून दिली प्रतिनियुक्ती

Latest Marathi News Updates : शिवतीर्थावर राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये खलबतं

Ashwini Kedari : कलेक्टर होण्याचे स्वप्न राहिले अपूर्णच! पाळू येथील अश्‍विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT