0Imtiaz_20Jaleel_0 
छत्रपती संभाजीनगर

विधानसभेत काही आमदार पैसे उकळण्यासाठी विचारतात प्रश्‍न, इम्तियाज जलील यांचा आरोप

ई सकाळ टीम

औरंगाबाद : महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत प्रश्‍न विचारुन अधिकारी व कंत्राटदारांकडून पैसे उकळतात, असा आरोप एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता.२३) केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये जलील म्हणतात, की महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रश्‍न विचारतात. हे सत्यस्थिती सर्वांना माहित आहे. पण मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार!

लोकप्रतिनिधींचे कशा पद्धतीने लागेबांध राजकारणात आहेत, हे सर्वश्रूत आहे. नेमके त्यावर जलील यांनी बोट ठेवले आहे. त्यांच्या आरोपाला विधानसभेचे सभापती कसा प्रतिसाद  देतात हे पाहण्यासारखे राहिल. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन गेले. मात्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली नाही. यावर बोलताना खासदार जलील म्हणाले होते, की योगी आदित्यनाथ यांनी सर्वात अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती. उत्तर प्रदेशात जात, धर्म यावर मोठे राजकारण केले जाते. अशा प्रदेशात उद्योगपती कशी गुंतवणूक करतील असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. आज बुधवारी त्यांनी दिल्लीच्या सीमेवरील सिंघू, गाझियाबाद येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT