औरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. यात सर्व उपायांबरोबरच प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसीचा वापर करू नका, गरज असल्यावरच शक्यतो एसीचा वापर करा, असे सांगण्यात आले आहे.
देशाच्या तुलनेत आपल्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत राज्य शासन उपायांसाठी प्रयत्नशील आहे. 18 मार्चला शासनाने अत्यंत तातडीचे आदेश काढले आहेत.
त्यात वातानुकूलित यंत्रांचा (एसी) वापर कमी करावा, याबाबतही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालयातही एसी न वापरण्याच्या व आवश्यकता असेल तरच एसी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना (COVID-19) विषाणूचा प्रसार मुख्यत्वे खोकल्यातून, शिंकण्यातून जे शिंतोडे उडतात, त्यातूनच मोठ्या प्रमाणावर होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे.
शिंकेतून, खोकल्यातून उडालेले थेंब हवेतील धूलिकणांसोबत विविध वस्तूंच्या पृष्ठभागावर स्थिरावतात. मध्यवर्ती वातानुकूलन किंवा वातानुकूलित (एसी) खोलीत असे विषाणूमिश्रित थेंबातील विषाणू जास्त कालावधीसाठी जिवंत राहतात. त्यामुळे प्रादुर्भावाची शक्यता बळावते.
एसी न वापरल्यास हा फायदा
योग्य व्हेंटिलेशन (वायुविजन) किंवा तापमान जास्त असलेल्या वातावरणात विषाणूमिश्रित थेंब लवकर सुकतात. त्यामुळे या विषाणूचा जीवन कालावधी कमी होतो व रोगप्रसाराला प्रतिबंध होतो. म्हणून एसी न वापरल्यास फायदा होऊ शकतो.
म्हणूनच हे करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.