Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांनो, खबरदार! आता घराबाहेर पडायचेच नाही : फळ खरेदीची सुटही रद्द

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : लॉकडाउन असतानाही वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून पोलिस आणि जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याची खंत व्यक्त केली. यानंतर आता बुधवारपासून (ता.२९) सकाळी अकरापर्यंतच जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी-विक्री करता येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ११ वाजतापर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. या काळात केवळ औषधी दुकानेच उघडी असतील, असे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करून कुणी जर बाहेर पडत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार नाही. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०५ पर्यंत पोचली आहे. हॉटस्पॉटच्या संख्येतही वाढ झाल्याने जिल्हा, महापालिका व पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. संचारबंदी, जमावबंदी घोषित करून महिना लोटला तरीही त्याची कठोर अंमलबजावणी झाली नाही. लोक खुलेआम फिरत असल्याने कुठलेही नियम पाळत नसल्यानेच शहरात शंभरच्या पुढे कोरोनाचे रुग्ण पोचले आहेत.

पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेली नरमाईची भूमिकाच यास कारणीभूत आहे, असा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत. शिवाय याबाबत सोशल मीडियातून चौफर टीकाही करण्यात येत आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन कडक लॉकडाउन करण्याबाबत मागणी केली. 

सकाळी अकरापूर्वीच करा खरेदी 
ता. २९ एप्रिल ते तीन मेपर्यंत लॉकडाउन व संचारबंदी जास्त कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू किंवा इफ्तारसाठीची फळे आता सकाळी अकराच्या अगोदरच खरेदी करावी, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT