4mask_26 
छत्रपती संभाजीनगर

मास्क न वापरल्याबद्दल मोजले ३५ लाख, औरंगाबादेत साडेपाच महिन्यांत सात हजार जणांकडून दंड वसूल

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शहरात आतापर्यंत सुमारे साडेसातशे जणांचा मृत्यू झाला असला तरी नागरिक गंभीर नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक जण दंड भरू पण विनामास्क फिरू, अशा आविर्भावात फिरत आहेत. एक मे ते २० ऑक्टोबरदरम्यानच्या साडेपाच महिन्यांमध्ये शहरातील सुमारे सात हजार १६८ जणांकडून ३५ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, हे त्याचेच द्योतक आहे.


कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छता, गर्दी टाळणे आदी उपाययोजना आवश्यक असून तसे शासन, प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जाते. यातील काही नियम न पाळणाऱ्यांना दंड करण्याचे इशारे आणि अंमलबजावणीही सुरू झाली; मात्र तीही सवयीचा भाग बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मास्कबाबत तसे घडताना दिसते. मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार शहरात घनकचरा विभागातर्फे सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथकाद्वारे एक मेपासून कारवाया सुरू करण्यात आल्या. एक मे ते २० ऑक्टोबरदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या सात हजार १६८ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ८४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT