3crime_201_163 
छत्रपती संभाजीनगर

Breaking : एकाच कुटुंबातील तिघांचा तीक्ष्ण हत्याराने खून, पैठण शहराजवळील धक्कादायक घटना

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरापासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावरील जुने कावसन या गावात शनिवारी (ता.२८) पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तीन जणांची तीक्ष्ण हत्याराने खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजु निवारे (वय ३५), आश्विनी राजु निवारे (वय ३०) व मुलगी सायली राजु निवारे (वय १०) अशी खुन झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असुन पोलिस उपअधीक्षक गोरक्ष भामरे, किशोर पवार, फौजदार सी. जी. गिराशे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या तीन जणांच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. रुग्णालयात तपासणीसाठी पैठण येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आणले आहे. दरम्यान, घटनास्थळी औरंगाबाद येथुन श्वानपथक आले आहे. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुलकर्णी, पोलिस हवालदार ना.एल.पठाण, गणेश व्यवहारे, डॉग स्वीटी हे तपास करित आहेत. या घटनेत मुलगा सोहम निवारे (वय ६) याच्यावर ही वार करण्यात आले असुन तो गंभीर जखमी झाल्याने औरंगाबाद येथील घाटीत हलविण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

SCROLL FOR NEXT