2Aurangabad_Municipal_Corporation_0
2Aurangabad_Municipal_Corporation_0 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिकेच्या शाळांचा आज फैसला, निर्णयाकडे पालकांचे लक्ष

माधव इतबारे

औरंगाबाद : शाळा सोमवारपासून (ता. २३) सुरू करायच्या किंवा नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशी भूमिका शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २०) जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार याबाबत आता उत्सुकता असून, शनिवारी (ता.२१) यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.


राज्यातील ९ वीचे १२ पर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील ३६१ शाळा सुरू करण्यासाठी तयारी झाली आहे. या शाळांतील नववी ते बारावीच्या विद्यार्थांची संख्या सुमारे ७८ हजार एवढी आहे तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी १०४४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

शाळाखोल्या निर्जंतूक करण्याचे कामही सुरू आहे. असे असतानाच शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. त्यामुळे शहरातील शाळा सुरू होणार का? यासंदर्भात विचारणा केली असता श्री. पांडेय यांनी, याबाबत शनिवारी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्रशासक काय निर्णय घेतात विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT