2Sakal_20News_11 
छत्रपती संभाजीनगर

आजपासून औरंगाबाद शहरात ११ वी, १२ वीच्या वर्गांना परवानगी

माधव इतबारे

औरंगाबाद  : शहरात ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास तीन डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत असल्याने मंगळवारपासून (ता. १५) ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मिशन बिगेन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासक श्री. पांडेय यांनी तीन जानेवारीपर्यंत वर्ग भरविण्यास परवानगी दिली नव्हती. दरम्यान सोमवारी (ता. १४) यासंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यात ११ वी १२ वीचे वर्ग मंगळवारपासून सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांना चाचणी करणे आवश्‍यक आहे. तसेच पालकांकडून संमतिपत्र घेण्यात यावेत. कोरोनासंदर्भातील शासन आदेशाचे पालन करण्यात यावे. ज्या विद्यार्थाने ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला असेल, त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT