Wanchit Bahujan Aghadi Agitation
Wanchit Bahujan Aghadi Agitation 
छत्रपती संभाजीनगर

मंत्री वडेट्टीवारांच्या विरोधात औरंगाबादेत‘वंचित’चे आंदोलन, जाती-जातीत भांडण लावत असल्याचा आरोप

प्रकाश बनकर

औरंगाबाद : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थामधील (महाज्योती) एका विशिष्ट जातीसीठी इतर मागसवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीआर काढला आहे. भटक्या विमुक्त जातीमधील लोकांसाठी हा जीआर नसल्याचा आरोप करीत शनिवारी (ता.पाच) वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. जाती-जातीत भांडण लावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पश्‍चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी केला.

सुभेदारी विश्रामगृहावर कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद होणार होती. यावेळ वंचिततर्फे वडेट्टीवार यांना जीआर बाबत पुन्हा निवेदन देण्यात येणार होते. मात्र, ती अचानक रद्द करणायात आली. मंत्र्यांच्या भेटीसाठी वंचितचे पदाधिकारी दोन ते तीन तास थांबले. पत्रपरिषद रद्द झाल्याने वंचितचे पदाधिकारी अक्रमक होत त्यांनी मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. श्री. बन म्हणाले की, वडेट्टीवार हे जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. यामुळे या कायदा सर्व भटक्या विमुक्तांसाठी लागू करण्यात यावात अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी रामेश्‍वर तायडे, रंजन साळवे, मिलिंद बोर्डे, पी.के. दाभाडे, शैलेश मिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT