Monkey Kills Pappies In Beed District esakal
मराठवाडा

धक्कादायक! महिनाभरात वानरांनी घेतला २५० कुत्र्यांच्या पिलांचा जीव

वानरे बनली कुत्र्यांचा कर्दनकाळ

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील लवुळ येथे वानरांनी मागील एक महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांना मारले असल्याचे लवुळवासीय सांगत असुन याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शहरापासुन जवळच असलेल्या लवुळ येथे मागील एक ते दीड महिन्यापासून (Beed) तीन मोठ-मोठ्या वानरांचा वावर आहे. हे वानरं गावात असलेल्या कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात उंच झाडावर किंवा घरावर जातात व या ठिकाणाहुन या पिल्लांना फेकुन देतात. परिणामी यात पिल्लांचा (Monkey) जागीच मृत्यु होत आहे. आतापर्यंत या वानरांनी २०० ते २५० पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान गावातील सिताराम नायबळ यांच्या घरी असलेल्या कुत्र्यांच्या पिलाला वानर घेऊन गेले होते.(Beed Updates Monkey Kills Number Of Pappies In Majalgaon)

यानंतर पिल्लू विव्हळत असल्याने नायबळ यांनी गच्चीवर जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करत असतांना वानरांनी त्यांच्यावर धावा केला. यात नायबळ पळत असतांना गच्चीवरून खाली पडले. यात ते जखमी झाले आहेत. याबाबत लवुळ ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाशी संपर्क साधला परंतु एकदिवस हे अधिकारी आले आणि वापस गेले. यानंतर त्यांनी लवुळकडे पाहिले देखील नसल्याने या वानरांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी लवुळवासीयांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT