Nanded-DCC-bank.jpg 
मराठवाडा

जिल्हा बँकेतील व्यवहार सुरू ठेवा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा पिकविमा वाटप व नुकसान भरपाइचे वाटप रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांचा पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, उसाचे बिल आधी रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत येत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आर्थिक व्यवहार सुरू करावेत अशी मागणी ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे व्यवहार बंद
ग्रामीण भागातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखांत पिक विमा नुकसान भरपाई उसाचे बिल आदीचे पैसे जमा आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभीच्या काळात जिल्हा प्रशासनाने शाखेतील आर्थिक व्यवहार बंद करण्यासंदर्भात सर्व शाखांना पत्र दिले होते. परंतु नंतर बँक अत्यावश्यक सेवा म्हणून सर्व व्यवहार सुरळीत करण्यासंदर्भात सांगितले आहे. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अद्याप आर्थिक व्यवहार सुरू झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मजूरीसाठी नाहीत पैसे 
सध्या लॉकडाउनमुळे शेतकरी आपापल्या शेतावर कामे करत आहेत. हळद, एरंडी, गहू काढण्याची कामे जोरात असून मजूरासंह अन्य कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची निकड भासत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर आर्थिक व्यवहार सुरू करावे अशी मागणी प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

अनेक शेतकऱ्यांचे अडकले पैसे
शासनाने शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, पिकविमा वाटपाचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला दिले आहे. परंतु या बॅंकेकडील अपूरे मनुष्यबळ व तोकडी यंत्रणेमुळे अनेक शाखांत शेतकऱ्यांचे पैसे वेळेत वाटप होत नाहीत. मागील तीन महिन्यापासून अतिवृष्टीचे अनुदान बॅंकेला देवूनही त्याचे वाटप अद्याप झाले नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. यामुळे शासनाने पिकविमा व पीएक किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवावे, अशी मागणी होत आहे.   

अत्यावश्यक परिस्थितीत ठेवीदारांना मिळणार पैसे 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत गर्दी टाळण्यासाठी ता. २३ मार्च ते ता. ३१ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाखेत दुष्काळी अनुदान, पिकविमा व ऊस बिलाची रक्कम नगदी वाटपाचे काम बंद केल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी दिली. परंतु ग्राहकास अत्यावश्यक परिस्थितीत व वैद्यकीय कारणासाठी ठेविदारांच्या गरजेप्रमाणे उचल एटीएम कार्डचा वापर करुन रक्कमेची उचल करावी. व अनावश्यक गर्दी टाळून राष्ट्रीय आपत्तीपासुन बचाव करावा, असे आवाहनही श्री कदम यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

SCROLL FOR NEXT