covid 19
covid 19 covid 19
मराठवाडा

कोरोना चाचणीसाठी ग्रामीण भागातील टाळाटाळ ठरतेय धोकादायक

सकाळ वृत्तसेवा

बीड: एकीकडे दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणू (corona virus) जीवघेणा ठरत असताना ग्रामीण भागात कोरोनाबाबतच्या पसरलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज नागरिकांना कोरोनाच्या खाईत ढकलण्यास कारणीभूत ठरत आहेत. तीव्र स्वरूपाची लक्षणे असूनही अनेकजण कोरोना चाचणीसाठी टाळाटाळ करत असून, गाव-खेड्यातील डॉक्टरांकडून औषध घेऊन आजार अंगावर काढत असल्याचे भयावह चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

कोरोना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील फार मोठे षडयंत्र आहे. साधी सर्दी जरी असेल, तरी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो. मग सरकारी दवाखान्यात भरती करून घेतले जाते. तेथे हाल केले जातात. असे अनेक तर्क-वितर्क ग्रामीण भागात लढविले जात आहेत. कोरोना - बिरोना सब झूट है.. अशा फुशारक्या मारत कोरोनाच्या त्रिसूत्रीला खुंटीवर टांगून गावभर हुंदडणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेकदा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही संबंधित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास थेट नकार देत असल्याने आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे. अशा मानसिकतेतूनच कोरोना मृत्यूदर वाढत आहे.

जोवर रुग्णाची प्रकृती खालावत नाही, तोपर्यंत रुग्णही त्याच डॉक्टरकडून उपचार घेतो. एवढे करूनही प्रकृतीत फरक पडला नाही, तर मग शासकीय रुग्णालयाची वाट धरली जाते. रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्यानंतर डॉक्टरही हतबल होतात. अतिशय गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे डॉक्टरांनाही कठीण जाते. त्यामुळे थोडी जरी लक्षणे आढळली, तरी संबंधित रुग्णाने तातडीने कोरोना चाचणी करून घेऊन पॉझिटिव्ह आल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

सध्या कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासकीय यंत्रणा कडक उपाययोजना करत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. अशात टाकरवण येथे ताप, सर्दी, अंगदुखी यासारख्या आजारांनी डोके वर काढले काढल्याने नागरिक चिंतेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT