corona corona
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत २९५ जणांना बाधा

हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही एकच रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता. सहा) २९५ नवे कोरोनाबाधित आढळले तर पाच जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातील १३२ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७५ रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही केवळ एकच रुग्ण आढळला.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ४३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यापैकी शहरातील ११ रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात नऊ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. सध्या ६७ रुग्ण उपचार घेत असून, एक बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.

दिवसभरात लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या दोन हजार ४०५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसून ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला तर १३२ रुग्ण आढळले.

जालना जिल्ह्यात जिल्ह्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. नव्याने ११ रुग्ण आढळून आले असून, २० रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ७५ नवीन रुग्णांची भर पडली. दिवसभरात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. या जिल्ह्यातही मृत्यूची नोंद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT