20navi_20mumbai_6_1 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा, आज २१ जणांना कोरोनाची लागण

तानाजी जाधवर

उस्मानाबाद  : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.२७) २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मृत्युची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये मृत्यू होण्याची कमालीची घट झाल्याने निश्चितपणे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १४ हजार ७७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के इतके झाले असुन जिल्ह्यात शुक्रवारीही २१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ८८८ इतक्या संशयितांची तपासण्या करण्यात आल्या.

त्यातील १५ हजार ६७४ इतक्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना होण्याचे प्रमाण १६.१८ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील १२९ जणाचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्यातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३६६ संशयितांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर उस्मानाबाद सहा, कळंब सात, परंडा पाच, लोहारा, तुळजापुर व वाशी प्रत्येकी एक जण बाधित झाले आहेत. भूम व उमरगा तालुक्यामध्ये एकाही रुग्णांची नोंद नाही.


उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५६७४
बरे झालेले रुग्ण - १४७७९
उपचाराखालील रुग्ण- ३३०
एकुण मृत्यु - ५६५
आजचे बाधित - २१
आजचे मृत्यु - ००

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT