file photo 
मराठवाडा

संचारबंदी शिथील होताच उसळली गर्दी; वाचा कुठे?

सकाळ वृत्तसेवा

परभणी : दोन दिवसाच्या संचारबंदी नंतर शनिवारी (ता.२५) बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांसह नियमांची चिंधड्या उडून परिसराला सण-उत्सव जत्रे प्रमाणे स्वरूप आले होते.
जिल्हा प्रशासनाने शेजारील जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शहर परिसरात दोन दिवसाची कडेकोट संचारबंदी लागू केली होती. या दोन दिवसात वैद्यकीय सेवा वगळता अत्यावश्यक सेवेची दुकानेदेखील बंद ठेवण्यात आली होती. 
ही बंदी शुक्रवारी मध्यरात्रीपासून उठली व शनिवारी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. 


राज्यात करू नकोस त्यांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात मात्र, दुसरा रुग्ण आढळून आलेला नाही, ह सुदैव.  तरीदेखील खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासन वेळोवेळी नियमांचे पालन करण्याचे, सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करीत आहे. दोन दिवसाच्या संचारबंदी नंतर शनिवारी पहाटेपासूनच लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरल्या. त्यातही मुख्य बाजारपेठेत तर कमालीची गर्दी होती. वाहने तर सोडाच पाय ठेवायलादेखील जागा शिल्लक नव्हती. वाहनांचे आवाज, त्यांची कर्णकर्कश हॉर्न, खरेदीसाठी  आवाजामुळे  प्रचंड ध्वनी निर्माण  होत होता. त्यातच अनेक मार्ग बंद असल्यामुळे एकाच मार्गावरील वाहतूक जागोजागी ठप्प झालेली होती. तर किराणा, भाजीपाला यासह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गोंधळ उडाला होता. यामध्ये कुठलीही सामाजिक भान कोणताही नागरिक राखत नसल्याचे दिसून आले. तसेच अनेकांनी तोंडावर मास्क सुद्धा लावलेले नव्हते. त्यामध्ये नागरिकांसह विक्रेत्यांचा देखील समावेश होता. त्या तुलनेत शहराच्या बाह्य वसाहतीतील मात्र, वेगळे चित्र होते. अपवाद वगळता किराणा दुकाने, भाजीपाला खरेदी करतांना  सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न केला जात होता. पण, क्रांती चौक गांधी पार्क, कच्ची बाजार, अष्टभुजा देवी मंदिर, जुना मोंढा, नवा मोंढा हे परिसर तर गजबजून गेले होते.
 
हेही वाचा - सहा गावांतील रेशीम उत्पादकांचे साडेपाच कोटींचे नुकसान, कुठे आणि का ते वाचा...


शिथील वेळेबाबत संभ्रमावस्था 
प्रशासनाने  शनिवारी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत  संचारबंदी शिथील करण्याची जाहीर केले होते. परंतु, या वेळेबद्दल नागरिकांसह पोलिस प्रशासनामध्ये संभ्रमावस्था दिसून आली. काही परिसरात सकाळी साडेदहा वाजले नंतरच विक्रेत्यांना हटवण्याचे, दुकाने बंद करण्याचे काम सुरु झाले होते. तर काही भागात दुपारी दोन वाजेपर्यंत व्यवहार सुरू होते. संचारबंदी नेमकी कोणत्या कालावधीत शिथिल करण्यात आली. त्यावेळी बद्दल मात्र, नागरिक, विक्रेते संभ्रमावस्थेत होते.

भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण आवश्यक 
भाजीपाला खरेदीसाठी प्रचंड गर्दी व गोंधळ उडत आहे. त्यामुळे भाजीपाला केंद्रांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाले आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी क्रांती चौक, जुना मोंढा, अष्टभुजा देवी मंदिर, आर. आर. टावर, उघडा महादेव आदी परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. या भाजीपाला केंद्रांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. शनिवार बाजार येथे शनिवार वगळता अन्य दिवशी दिवशी सामाजिक आंतर राखत भाजी केंद्रे सुरु केल्यास गर्दीचेही विभागणी होऊ शकते व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील गर्दी त्यामुळे कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:च्या आमदारांचा विरोध तरी ठाकरे बंधूच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्यांचा भाजप प्रवेश, मंत्री महाजनांसमोर राडा

Kolhapur Crime: गुलाल, भात, अन् टाचण्या टोचलेले लिंबू... कोल्हापुरात गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांमध्ये दहशत

Shivaji Maharaj Video: इतिहास जिवंत झाला! शिवराज्याभिषेकापासून रायगडच्या 3D मॅपिंगपर्यंत… 2025 मध्ये AI ने घडवलेले शिवरायांचे थरारक क्षण

Christmas Viral Video: ख्रिसमसची खास सुरुवात, मुंबई चर्चचा व्हिडिओ पाहिलात का?

लैंगिक संबंध करताना सापडले! प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा केला निर्घृण खून; मृतदेह ग्राइंडरने कापून फेकला नाल्यात

SCROLL FOR NEXT