File Photo 
मराठवाडा

‘त्या’ २५ संशयितांच्या अहवालाकडे जिल्हाप्रशासनाचे लक्ष

शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्‍ह्यात हजारो कामगार, नौकरदार कामासाठी राज्यासह इतर राज्यात स्थलांतरीत झाले होते. परंतु लॉकडाऊनची घोषणा होताच अनेकजण गावी परत आले आहेत. गावी परत आलेल्या प्रवाशी व्यक्तींची रोज नव्याने तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.नऊ एप्रिल २०२०) जिल्ह्यातील २५ संशयितांच्या घशातील लाळेचे नमुने (स्वॅब) घेऊन ते औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

यापूर्वी सोमवारी (ता. सहा एप्रिल २०२०) दिल्ली येथुन आलेल्या दोन आणि इंडोनेशिया येथुन शहरात आलेल्या एकुण १२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह प्राप्त झाले होते. त्यानंतर बुधवारी (ता.आठ एप्रिल २०२०) जिल्ह्यातुन एकही संशयित व्यक्ती सापडली नव्हती. मात्र गुरुवारी अचानक २५ संशयित सापडले असून, त्यांचे स्वॅब औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, शुक्रवारी (ता.१० एप्रिल २०२०) त्या सर्वांचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
हेही वाचा - प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी

66 हजारापेक्षा अधिक स्थलांतरीत गावाकडे परतले

नांदेड जिल्ह्यातील अनेक गावे, वाडी, तांडे, वस्त्यावरील नागरीकांच्या हाताला काम मिळत नसल्याने व पाण्याची टंचाईमुळे हजारो लोक काही महिण्यासाठी जवळच्या राज्यात व मोठ्या शहरात स्थलांतरीत होतात. यावर्षी देखील ६६ हजारापेक्षा अधिक बेरोजगार मजुर कामासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, तेलंगणा, आंध्रा अशा विविध ठिकाणी स्थलांतरीत झाले होते. लॉकडाऊन होताच हे नागरीक गावाकडे पोहचली आहेत.

लॉकडाऊनमुळे हजारो मजुर रस्त्यात 

काही कामगार उशिरा निघाल्याने लॉकडाऊनमुळे रस्त्यातच आडकली आहेत. अशा नागरीकांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढु नये म्हणून त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्यासाठीचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांच्या जेवणाची व राहण्याची शासन व्यवस्था करत आहे. जिल्‍ह्यात आलेल्या प्रवाशांची जिल्हा प्रशानाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशी नागरीकांपैकी रोज आठ ते दहा संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नांदेड जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

SCROLL FOR NEXT