फोटो 
मराठवाडा

‘धावंडा डिंकाच्या’ सुगीतून मिळतोय रोजगार

रामराव मोहिते

घोगरी (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : परतीच्या पावसाने बहुतांश पिके वाया गेल्याने, गावात पुरेसा रोजगार मिळत नसल्याचे पाहून, रोजंदारीच्या शोधात बाहेरगावी गेलेले वन मजूरदार, उन्हाळ्याची चाहूल लागताच घराकडे परतत असल्याने पुन्हा खेडे गजबजून गेल्याचे चित्र आहे. गत आठवड्यापासून बऱ्यापैकी ऊन तापत असल्याने, जंगलातील वनसंपदेपासून मिळणाऱ्या ‘धावंडा डिंकाची’ सुगी करण्यात शेतकरी गुंतला आहे.

परतीच्या पावसाने कहर केल्याने हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, ही पिके वाया गेल्याने या भागातील मजुरांना गावात रोजगार मिळेनासा झाल्याने नाईलाजाने बरीचशी कुटुंब रोजगाराच्या शोधात बाहेरगावी गेली. यामुळे तळ्याची वाडी, गवतवाडी ही जंगल भागातील आदिवासी बहुल गावे ओसाड भासू लागली. गत आठवड्यापासून घोगरी परिसरात चांगले ऊन तापू लागल्याने व या परिसरात वनसंपदे पासून मिळणारा ‘धावंडा डिंक’, चारोळ्या, तेंदूपत्ता, मोह फुले याची सुगी कडक उन पडताच मिळू लागल्याने साहजिकच त्यांची पावले आपोआपच गावाकडे वळत असल्याने खेडी पुन्हा गजबजून गेली आहेत. 

आठवड्याला जवळपास तीन किंटल धावंडा डिंक संकलन होतो

रोजंदारी करणारे संपूर्ण कुटुंब आज लवकर उठून, सोबत भाकरी, पाणी घेऊन, डिंकाच्या शोधात रानोमाळ भटकंती करून धावंडा डिंकाचे संकलन करताना दिसतो आहे. यावर्षी धावंडा वृक्षाला बऱ्यापैकी डिंक लागला असल्याने, शिवाय प्रत्येक वन मधुरास बऱ्यापैकी मिळत असल्याने, तळ्याची वाडी, या एका गावातून आठवड्याला जवळपास तीन किंटल धावंडा डिंक संकलन होत असल्याचे बोलले जाते. याशिवाय हा हंगाम संपताच लगेच रानचा मेवा चारोळी सुगीला सुरुवात होते. ही सुगी किमान वीस ते पंचवीस दिवस चालते व लगेच तेंदूपत्ता, मोह फुल संकलन अशा या वनसंपदेपासून जवळपास दोन महिने येथील वन मजुराला रोजगाराची संधी उपलब्ध होते.

संकलन केलेला डिंक वेळेवर नेणे गरजेचे

धावंडा डिंक जसा जसा गोळा होईल त्याप्रमाणेच त्या डिंकाची लवकर विक्री होणे गरजेचे असते. पांढराशुभ्र (उत्तम प्रतीचा) डिंका असूनही लवकर विक्री न झाल्यास तो तांबडा पडत असल्याने या डिंकाला कमी किमतीत विकावे लागत असल्याने वनमजुरांचे मोठे नुकसान होत आहे. संबंधित ठेकेदाराने संकलन केलेला डिंक वेळेवर नेणे गरजेचे गरजेचे आहे. यामुळे वन मजुराचे होणारे नुकसान टाळण्यास मदत मिळणार आहे.

वनसंपदा सुकत असल्याने भाग विरळ

पावसाळा सुरू होताच येथील जंगलात परप्रांतातील मेंढपाळ या जंगलात आलेले दिसून येतात. शिवाय त्यांनी ज्या ठिकाणी आपली मेंढर बसवली, त्याठिकाणी जास्तीचे शेणखत पडत असल्याने, त्या जागेवरची वनसंपदा आपोआपच सुकून जात असल्याने, हा भाग विरळ होत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते रामजी वाकोडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT