gram panchayat
gram panchayat 
मराठवाडा

Gram Panchayat Election: वयाच्या 60 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात; 40 वर्षांपासून विजयी

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : तब्बल 40 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य म्हणून निवडून आलेले उमेदवार वयाच्या साठाव्या वर्षी पुन्हा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकारणाची गोडी लागलेल्या माणसाला राजकारणाचे वेढ किती असते यावरून दिसून येत आहे.

सोनवळा ता.जळकोट येथील बाबुराव सुर्यवंशी वय वर्षे साठ. सुर्यवंशी हे गावातील वार्ड क्रंमाक 1 मध्ये तब्बल चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक लढत आले आहेत. आता त्यांनी सन 2021 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

यापूर्वी सोनवळा ता.जळकोट ग्रामपंचायतीचे आरक्षण हे अनुसूचीत जातिसाठी सुटले होते. सरपंचपदाचे आरक्षण आपल्याला सुटले असल्याने वयाची पर्वा न करता त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने पूर्वीचे आरक्षण रद्द करून मतमोजणीनंतर आरक्षण सोडत होणार असल्याची घोषणा झाली. पंरतु सुर्यवंशी यांना यांचे कोणतेही दुख: झाले नाही.

आपली ही शेवटची लढाई असून आपण ही जिंकणारच या आशेने त्यांनी उमेदवारी अर्ज भरुन प्रचाराला लागले आहेत.विशेष म्हणजे ज्या पँनलकडून ते थांबत होते त्या पँनलचा एकदाही सरपंच झाला नाही तरीही राजकारणाचे वेढे असलेल्या श्री.सुर्यवंशीना शेवटची लढाई लढण्याची जिद्द अजूनही अंगात आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT