माजलगाव (जि. बीड) - मुलीचे नगर जिल्ह्यात विनापरवाना लग्न लावून परत गावात आल्यानंतर ग्रामसेवकाने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले; परंतु त्यासाठी त्यांनी नकार दिला. यामुळे ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून मुलीच्या वडिलांसह पाचजणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना लोणगाव (ता. माजलगाव) येथे घडली.
लोणगाव (ता. माजलगाव) येथील युवराज निंबाळकर यांच्या मुलीचा विवाह चार दिवसांपूर्वी अहमदनगर येथे विनापरवाना करण्यात आला. या लग्नासाठी युवराज निंबाळकर, शेषेराव निंबाळकर, शिवराज निंबाळकर, मीरा निंबाळकर, अलका निंबाळकर हे नगर जिल्ह्यात गेले होते. तेथे लग्न लावून गावाकडे परतले.
सर्वजण हे परजिल्ह्यात जाऊन आल्याने सध्या सुरू असलेला साथीचा रोग सुरू असताना सर्वजण विनामास्क लावून गावात फिरत होते. यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांना रीतसर पास काढून तुम्ही गेला होतात का, असे विचारले. त्यांनी विनापरवाना गेल्याचे सांगितल्याने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले होते परंतु यासाठी सर्वांनीच नकार देत विरोध केला. यामुळे ग्रामसेवक सुहास गायकवाड यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्याच्या दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व पाच जणांविरुद्ध शुक्रवारी (ता.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.