Sakal
Sakal 
मराठवाडा

दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या गोविंदाने घेतला जगाचा निरोप, लेकीच्या लग्नाची इच्छा राहिली अपूर्ण 

बाबासाहेब उमाटे

देवणी (जि.लातूर) : कर्जबाजारीपणा, आजाराला लागणारा मोठा खर्च, मुलीच्या लग्नाची चिंता अन् सततच्या आर्थिक अडचणीला कंटाळुन इस्मालवाडी (ता.देवणी) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतीतच विषप्राशन करत मंगळवारी (ता.१७) आपली जीवनयात्रा संपवली. इस्मालवाडी येथील गोविंद गणपत आंबुलगे- सुर्यवंशी (वय ५०) हे पुणे येथे हातगाड्यावर केळी विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यातच त्यांना कँसर या जीवघेण्या आजाराने ग्रासले. मुलीच्या लग्नासाठी जीवनभर राबुन साठवलेले चार लाख रुपये कॅन्सरच्या आॅपरेशनवर झाल्याने व शिल्लक काहीच नसल्याने मार्चमध्ये लॉकडाऊनच्या काळात ते गावाकडे आले.

मात्र आर्थिक विवंचनेने येथेही त्यांचा पाठ सोडलीच नाही. जुनमध्ये आपल्या साठ गुंठे जमिनीवर तीन वेळा सोयाबीनची पेरणी करावी लागली. शिवाय अतिपावसाने सोयाबीन पिक हातीच लागले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर वाढतच होता. मुलगी रेणुका आंबुलगे (वय १९) हिच्या विवाहाची बोलणी सुरु होती. तीन ठिकाणचे पाहणे मुलगी पाहण्यासाठीही आलेले होते. मात्र हुंडा व विवाहाचा खर्च यासाठी आंबुलगे यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी येत असलेल्या अडचणी, त्यातच त्यांचा आजार बळावल्याने पुन्हा कॅन्सरचे आॅपरेशन करण्याचे निदान डॉक्टरांना लावले होते. या सर्वच बाबीतून त्यांना आत्महत्त्येचे टोकाचे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी शेतीत तणनाशक प्राशन केल्यानंतर वलांडी उदगीर येथे उपचार करुन लातुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 


मुलीच्या विवाहासाठी दानशुरपणाची गरज
इस्मालवाडी तालुक्यातील एक छोटे गाव. या गावातीलच उमदे व्यक्तिमत्त्व असलेल्या गोविंद आंबलुगे पुण्यात रोजीरोटी निमित्त स्थिरावलेला. गावातील कोणीही पुण्याला गेल्यानंतर पहिला मदतीचा अन् आपलकीचा हात गोविंद यांचाच असायचा आज त्यांचेच कुंटुब उघड्यावर आले आहे. मुलीचे लग्न, संसाराचा थांबलेला गाडा, दीड एकर माळरान शेतीतुन कुटुंबाची उदरनिवार्ह होणार तरी कसा हे आणि यासह अनेक प्रश्न आंबुलगे कुटुंबीयासमोर आवासुन उभारलेले आहेत. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अन् मुलगा अविनाश याच्या शिक्षणासाठी समाजातील दानशुरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT