file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यात शेतकरी सन्मानचे आठ लाख रुपये केले वसुल

राजेश दारव्हेकर

हिंगोली : प्रधानमंत्री सन्मान किसान योजनेच्या लाभासाठी अपात्र असतानाही आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांकडुन रक्कम वसूल केली जात आहे. जिल्ह्यात अशा ८४ शेतकन्यांकडून शेतकरी सन्मानाचे ८ लाख १४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी अपात्र असलेल्या शेतकयांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहायता म्हणून वर्षाला सहा हजार रुपये निधी देण्यात येतो. प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे वर्षभरात हा निधी दिला जात आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी यासाठी पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जात आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार जोडणी करण्याची सक्ती केली. ऑगस्टमध्ये याबाबतचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान कर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी करण्यात आल्यावर अशा कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल  करण्याचे निर्देश शासनाने दिले.

त्यावरून हिंगोली जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जात आहे. इतर अपात्र शेतकऱ्यांकडूनही ही वसूल रक्कम वसूल केली जात आहे.

आत्तापर्यंत ८४ शेतकऱ्यांकडून रक्कम केली वसूल जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी अपात्र असतानाही शेतकन्यांना लाभ घेतल्याचे स्पष्ट झाल्याने अशा शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. या शेतकऱ्यांना रक्कम परत करण्याचे आदेशप्रशासनाने दिले. त्यावरून अपात्र शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ८४ शेतकऱ्यांकडून ८ लाख १४ हजाररुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील १८ शेतकऱ्यांकडून १ लाख ६० हजार, वसमत तालुक्यातील २८ शेतकऱ्यांकडून २ लाख ८२ हजार तर कळमनुरी तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांकडून ३ लाख ७२ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.  शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील २ हजार ३०८ आहेत. त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील ३८२ , औंढा शेतकरी आयकर भरणारे अपात्र ठरविण्यात आले. नागनाथ ४१०. वसमत ५४६, कळमनुरी ५२३ तर सेनगाव तालुक्यातील ४४७ शेतकऱ्यांना किमान पहिला हप्ता मिळालेला आहे   अपात्र असलेल्या २३०८ शेतकयांना या योजनेतून दोन कोटी १६  लाख ५४ हजार रूपये वितरित करण्यात आले आहेत. यातील ८ लाख १४ हजार रूपये वसूल  करण्यात आले आहेत. अजून २ कोटी ८ लाख ४० वसूल करणे शिल्लक आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT