जालना - पावसाने जामखेड येथील शेतकरी भारत शेळके यांच्या शेतात साचलेले पाणी. sakal
मराठवाडा

जालना: सततच्या पावसाने हिरव्या स्वप्नांचा चुराडा

जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरात सततच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले.

भगवान भुतेकर

रामनगर : जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरात सततच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदाही ऐन बहरातील खरीप पिके डोळ्यांदेखत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून परिसरात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस पडत आहे. दरवर्षी अनेक अडचणीचा सामना करत मोठ्या उमेदीने शेतकरी कपाशी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप पिकांची लागवड करतात. यंदा पावसाने उशिरा का होईना समाधानकारक सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्पन्नाचे आशेने उत्साहाचे वातावरण होते. मात्र यंदा प्रथमच सततच्या पावसाने ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. अति पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.

बहुतांशी ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने जमीनी खरवडून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये द्राक्ष फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या मूग, उडीद या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओल कायम असून जमिनी खचण्याचे प्रमाणही वाढले आहे. लवकर लागवड झालेल्या मूग उडिदाच्या शेंगा तोडणीच्या हंगामातच सतत पावसाची रिपरिप सुरूच आहे.

त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना शेंगांची तोडणीही करता आलेली नाही. सततच्या पावसाने सर्वत्र दलदल व चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील ओढे, नदी, नाले, विहिरी ओसंडून वाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतातील आंतरमशागतीची कामे ठप्प झाल्याने गवताचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी दरवर्षीचा कर्जबाजारीपणा, महागडे बियाणे, रोगराई वरील कीटकनाशक फवारणी, बेभरवशाचा पाऊस आदी अडचणीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची यंदाही सततच्या पावसाने संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

"यंदा बहरात असलेली सर्वच खरीप पिके डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. शासनाने पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी." - हरिभाऊ गोरे, शेतकरी, भिलपुरी

"यंदाही अति पावसामुळे शेतकऱ्यांचा हाती आलेला खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने पंचनामा, स्थळ पाहणी यासारखे कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी."- प्रल्हादराव शिंदे, माजी सरपंच,उटवद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT