मराठवाडा

Jayakwadi Solar Project: 'जायकवाडी सौर प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध', निसर्ग, मानवी जीवितास धोक्याचा इशारा

जायकवाडी धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांकडून सांगण्यात आलय की या सौर प्रकल्पामुळे निसर्गास धोका निर्माण होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Jayakwadi Solar Project Protest: नाथसागर (जायकवाडी) जलाशयावरील नियोजित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प मच्छीमारांच्या उदरनिर्वाह आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणारा असल्याने पशू, पक्षी, जलचारांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असल्याने या प्रकल्पास मंजुरी देऊ नये, अशा मागणीचे साकडे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.

नाथसागर जलाशय पात्रात पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी म्हटले आहे की, नाथसागर जलाशयातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या माध्यमातून सर्व्हे

करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. स्वाभाविकच प्रकल्पामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रेडिएशन तयार होऊन त्याचा या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम होऊन त्यांना दुर्धर आजारांनी ग्रासन्याचा धोका यात विषद करण्यात आला आहे.

शिवाय या जलाशयात वर्षांतून चार वेळा प्रजनन क्षमता असलेल्या चिलापी जातीच्या माशांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीवर बंधने आल्यास चिलापी माशांची पैदास बेसुमार वाढून इतर जातींच्या माशांसह सर्वच जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार असल्याची बाब यात निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षांचे खाद्य हेच चिलापी माशांचे प्रमुख अन्न असल्याने मासेमारी बंद झाल्यास या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येऊन जलाशयातील प्रदूषण वाढल्याने हे पाणी मानवी आरोग्य तसेच सिंचनासाठी घातक ठरण्याचा धोका यात विषद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अपरिमित हानी होण्याची भीती

■ नाथसागर जलाशयाचा पाणीसाठा ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पाणीसाठा होत असला तरी यातील ७० टक्के पाणीसाठा वापरला जात असल्याने दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस फक्त ३० टक्के मृतसाठा शिल्लक राहत असल्याची बाब यानिमित्ताने प्रकर्षांने निदर्शनास आणून देण्यात आली आहे. यामुळे धरणातील पाणी झाकले जाऊन या पाण्यास गटारीचे स्वरूप येऊन रोगराई वाढून निसर्गाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

माजी मंत्री व आमदार गडाख यांनी याप्रश्नी लक्ष घालून नाथसागर जलाशयावरील नियोजित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास मजुरी मिळू देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी जैनपूर, वरखेड, रामडोह या नेवासा तालुक्यातील गावामधील तसेच संभाजीनगर येथील मासेमारी करणारे नागरिक उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT