Latur News MPSC Aspirants Agitation 
मराठवाडा

MPSC: लातुरमध्ये विद्यार्थ्यांचे तासभर आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

विकास गाढवे

लातूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रविवारी (ता.१४) होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी (ता.११) आज दुपारी जाहीर करताच या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत असंतोष उफाळला. वर्षभरापासून विविध कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बार्शी रोडवर दयानंद गेटसमोर एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले, वाहतूक सुरळीत झाली.

कोरोनाच्या काळातच नीट तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा घेण्यात आली. अकरा दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. येथे बारा केंद्रांवर तब्बल चौदा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मग 'एमपीएससी’च्या परीक्षेलाच काय अडचण, असा प्रश्न करत विद्यार्थी रस्त्यावर आले. त्यांनी तासभर आंदोलन करत सरकार व सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली, निर्णय रद्द करण्याची मागणी केली. शिवाजीनगर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत शांततेत आंदोलन केल्याचे पोलिस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT