सुधाकर तपसाळे, नवदांपत्य डॉ. रोहिणी आणि तेजस तपसाळे.
सुधाकर तपसाळे, नवदांपत्य डॉ. रोहिणी आणि तेजस तपसाळे.  
मराठवाडा

लग्नात आहेर ः नातेवाइकांना नव्हे; दिव्यांगांना!

सुशांत सांगवे

लातूर : लग्न जुळले की देवाणी-घेवाणीची बोलणी होतात. लग्न लावून द्या, नातेवाइकांना आहेर करा, मुलाच्या अंगावर एवढे सोने घाला आदी मागण्या होतात. त्यात मुलगा जास्त शिकलेला, परदेशात राहत असेल तर अपेक्षा वाढतात, पर्यायाने मागण्यांची यादी वाढत जाते.

लातूरमधील एका शेतकऱ्याने आपल्या उच्चशिक्षित, परदेशात असलेल्या मुलाच्या लग्नात एकही मागणी वधुपित्याकडे केली नाही. इतकेच नव्हे, तर लग्नसोहळ्याला लागणाऱ्या रकमेतून त्यांनी शहरातील पाच शाळांतील तब्बल 533 अंध-अपंग विद्यार्थ्यांना गणवेश दिले. त्यानंतर लग्नसोहळा साजरा केला. तोही गाजावाजा न करता, साधेपणाने. या ग्नसोहळ्याचे लातूरकरांकडून सध्या कौतुक होत आहे. 

सामाजिक भान जपणारा सोहळा
सामाजिक भान व्यक्त करणारा हा आगळा-वेगळा विवाह सोहळा शहरात नुकताच झाला. यासाठी शेतकरी सुधाकर तुळशीराम तपसाळे (वरपिता) यांनी पुढाकार घेतला होता. तपसाळे यांचा मुलगा तेजस याचे शालेय शिक्षण लातूरमध्ये झाले. त्याला शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्याला अमेरिकेत उच्चशिक्षण घेता आले. सध्या तो तिथेच नोकरी करीत-करीत पीएच.डी. पूर्ण करीत आहे. त्यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील डॉ. रोहिणी गोविंदराव बेलकर यांच्याशी जुळला.

साधेपणाने लग्न

लग्न अत्यंत साधेपणाने करण्याचा, नातेवाइकांना आहेर न करता सामाजिक संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधाकर तपसाळे यांच्या या निर्णयाला डॉ. रोहिणी यांच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार शहरातील एमआयडीसी भागातील मतिमंद शाळेतील 125, मूकबधिर मुलांच्या शाळेतील 160, संवेदना संस्थेतील 67, सुशीलादेवी मूकबधिर मुलींच्या शाळेतील 136, बुधोडा येथील स्वाधार अंध-अपंग पुनर्वसन केंद्रातील 45 अशा 533 विद्यार्थ्यांना गणवेश देऊन एक आदर्श उदाहरण निर्माण केले. 
एकीचे दोघांसोबत संबंध जीव गेला तिसर्याचाच
कन्या ही पवित्र, महान 

मुलाच्या किंवा किंवा मुलीच्या लग्नासाठी अनेक शेतकरी कर्ज काढतात. प्रसंगी जमीन विकतात. असे काही न करता साधेपणाने, सामाजिक जाणीव ठेवून लग्नसोहळा साजरा करता येऊ शकतो, हे मनात बिंबले होते. त्यानुसार देवाण-घेवाण, अनावश्‍यक आहेर-उपचार, भेटवस्तू आदी साऱ्या रूढी-परंपरांना छेद देत गरजू मुलांपर्यंत मदत पोचविण्याचा निर्णय घेतला. कन्या ही दानाची वस्तू नसून पवित्र, महान आहे. त्यामुळे नारळ आणि मुलगी स्वीकारत साधेपणाने विवाह सोहळा केला. वधुपित्याकडून एक ग्रॅम सोनेही स्वीकारले नाही. जे आम्ही केले, ते इतरांनीही करण्याचा प्रयत्न करावा, असे नम्र आवाहन सुधाकर तपसाळे यांनी "सकाळ'शी बोलताना केले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT