3Corona_102 
मराठवाडा

मुंबईहुन परतलेले परिवहन महामंडळाच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, आकडा वाढण्याची शक्यता

प्रकाश काळे

किल्लेधारुर (जि.बीड) : प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आठवडाभर मुंबईसह परिसरात वास्तव असलेले किल्लेधारुर येथील परिवहन महामंडळाचे ४४ कर्मचाऱ्यांपैकी २३ परतले आहेत. त्यांची सोमवारी (ता.नऊ) ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने केलेले भाकीत खरे ठरले आहे. दुपारनंतर अन्य कर्मचारी परततील असा अंदाज असुन सायंकाळपर्यत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात ११ बसेस व ४४ कर्मचारी पाठविण्यात आले होते.

दोन दिवसांत परतणार आहेत. मुंबईत लोकल्स व रेल्वे बंद असल्याने वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेस व कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून महामंडळाचे कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या खाईत लोटले जात आहे. प्रवाशी वाहतुकीसाठी येथील आगारातून दोन टप्प्यात २२ बसगाड्या व ८८ कर्मचाऱ्यांना मुंबईसह परिसरात पाठवण्यात आले होते. त्यापैकी रविवारी संध्याकाळपासुन परतलेल्या २३ कर्मचाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ‘सकाळ’ने वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. या संदर्भात सोमवारी सांयकाळपर्यंत पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आलेल्या ४४ कर्मचाऱ्यांच्या पैकी उर्वरित २१ कर्मचाऱ्यांची टेस्ट कोविड सेंटरमध्ये झाल्यानंतर नेमकी संख्या निश्चित होणार आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT