file photo
file photo 
मराठवाडा

दिवसभर ढगाळ, सायंकाळी दमदार

अनिल जमधडे

औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, मंगळवारी (ता. 22) सलग तिसऱ्या दिवशी पाऊस चांगला बरसला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पावसाळ्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी (ता. वीस) आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. 21) पावसाने हजेरी लावली होती. मतदान प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर लगेचच पाऊस झाला, त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदानावर परिणाम झाला, त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मंगळवारीही दिवसभर पाऊस उघडलेला होता. अधूनमधून काही प्रमाणात उन्ह पडत होते. मात्र, सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

सुरवातीला जोर नसलेल्या पावसाचा रात्री सातच्या सुमारास जोर वाढला. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस सलग बरसत होता. सणासुणादीच्या दिवसांमुळे सायंकाळी खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. दिपावलीच्या अनुषंगाने बाजारपेठ सज्ज झालेली आहे. मात्र, पावसामुळे बाजारपेठेतील गर्दी ओसरली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत असल्याने हवेतील आर्द्रता 92 टक्‍क्‍यांवर गेल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. 
----- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT