file photo
file photo 
मराठवाडा

महावितरणला ग्राहक मंचाचा दणका

सुषेन जाधव

औरंगाबाद : शेतात उभ्या असलेल्या महावितरणच्या डीपीत (रोहित्र) स्पार्किंग होऊन उसाला लागलेल्या आगीत शेती पिकाचे नुकसान झाले. या प्रकरणात ग्राहक मंचाने महावितरणला चांगलाच दणका दिला. मंचाने नुकसानभरपाईपोटी शेतकरी रघुवीरसिंग देविसिंग पवार (रा. पिंप्रीराजा, ता. औरंगाबाद) यांना एका महिन्याच्या आत एक लाख 84 हजार रुपये देण्याचे आदेश महावितरणला दिले.

प्रकरणाची सुनावणी मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्या संध्या बारलिंगे, किरण ठोले यांच्यासमोर झाली. प्रकरणात शेतकरी पवार यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. त्यानुसार श्री. पवार यांची विठ्ठलपूर शिवारात (पिंप्रीराजा) गट क्रमांक 6/9 मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील असणाऱ्या डीपीची महावितरणने देखभाल केली नाही. त्यात बिघाड होऊ पवार यांच्या शेतातील पाचटावर थिनग्या पडल्या. त्यामुळे लागूनच असलेल्या उसाने पेट घेतला. सदर प्रकारच्या नुकसानभरपाईसाठी श्री. पवार यांना जवळपास दोन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागले. त्यांना नुकसानभरपाईचा निर्णय उद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत होते; मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

श्री. पवार यांच्यातर्फे सुमित एकबोटे व प्रभाकर गाडेकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ग्राहक मंचाने नुकसानभरपाईपोटी एक लाख 84 हजार 450 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT