रेशीम उद्योग.jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद : रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जिल्ह्यातच होणार बाजारपेठ

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आता जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. रेशीम कोष निर्मितीमध्ये रांजणी (ता.कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाने पाऊल टाकले आहे. रेशीम कोष प्रक्रिया निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन एनसाई कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आता कर्नाटक ऐवजी जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील कळंब, वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. अनेक शेतकरी त्यांच्या रेशीमचे कोष घेऊन कर्नाटकात विक्रीसाठी जातात. तेथे जागतिक दर्जाची बाजारपेठ असल्याने जिल्ह्यातील रेशीम कोषाला चांगला भाव मिळतो. दरम्यान रांजणी येथील नॅचरल उद्योग समुहाने रेशीम कोष प्रक्रिया निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी एन. साई. साखर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, संचालक पांडूरंग आवाड, दिलीपराव भिसे, किशोर डाळे, विष्णू मोहिते, संभाजी रेड्डी, विष्णू डोलारे, रेशीम प्रकल्पाचे प्रभारी दिपक चांडगे आदी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

ठोंबरे म्हणाले की, जिल्ह्याच्या या भागात रेशीम कोषाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी कर्नाटक गाठावे लागते. शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या काळात ५०० किलो प्रतिदिन कोषावर प्रक्रिया करण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांकडून जास्तीची आवक झाल्यानंतर आम्ही यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. त्यांना शासनाकडून अनुदानही मिळत असल्याचा उल्लेख यावेळी ठोंबरे यांनी केला.

(Edit by Pratap Awachar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT