file photo 
मराठवाडा

परभणी : हाथरस प्रकरणी कॉंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

गणेश पांडे

परभणी ः हाथरस प्रकरणात केंद्रशासनासह उत्तर प्रदेशातील सरकारचा निषेध करण्यासाठी कॉग्रेसच्यावतीने सोमवारी (ता.पाच) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधाच जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप कॉग्रेसच्यावतीने केला जात आहे. या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी कॉग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी केले. यावेळी नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, सुनिल देशमुख, जयश्री खोबे,जाणु बी, इतकुर रहेमान खान आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कॉंग्रेसच्यावतीने देशभरात सोमवारी सत्याग्रह

हाथरस अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकारानंतर पिडित युवतीच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी गेलेले राहूल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण देशात उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तापले आहे. कॉग्रेसचे नेते व कार्यकर्ते आक्रमकपणे समोर येतांना दिसत आहेत. या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी कॉग्रेसच्यावतीने देशभरात सोमवारी सत्याग्रह आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार परभणी जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्ताग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप हटावो, लोकतंत्र बचावो, हाथरस की बेटी को इन्साफ दो अश्या घोषणाचे फलक हातात घेवून प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

देशात महिला व मुली सुरक्षित नाहीत

अंत्यत निंदनीय घटना आहे. देशात व विशेष करून उत्तर प्रदेशात हुकूमशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. या देशात महिला व मुली सुरक्षित नाहीत. याची नैतिक जबबादारी केंद्र सरकारने स्विकारली पाहिजे. या साठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. हाथरस प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांना कडक सजा द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे.

- आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष कॉग्रेस, परभणी

मोदी सरकार हे हुकूमशाहीचे सरकार

या देशातील शांतता व एकता खंडीत झाली आहे. देशातील मोदी सरकार हे हुकूमशाहीचे सरकार असून त्याद्वारे देशातील जनता भरडली जात आहे. यावर अंकुश ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे.

- नदीम इनामदार, शहरजिल्हाध्यक्ष, कॉग्रेस, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT