परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. मागील दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. पुढील तीन दिवस सुट्या आल्याने फाँर्म भरण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.
तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. बुधवार (ता.२३) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण दोन दिवसांमध्ये यात ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करण्यासाठी पळापळ करताना दिसून येत आहेत. तसेच घोषित झालेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
दरम्यान आता मतदानानंतर आरक्षण काढण्यात येणार असल्याने इच्छुकामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक घोषित झालेल्या ग्रामपंचायत मध्ये मोहा ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गर्देवाडी, सरफराजपूर मागास प्रवर्ग पुरुष, भोपळा अनुसूचित जाती पुरुष, रेवली, वंजारवाडी सर्वसाधारण महिला, लाडझरी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडल्याने निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत होती.पण आरक्षण रद्द करण्यात आल्याने सर्वांचा हिरमोड झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी येथील प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली असून अर्ज स्विकारण्यासाठी चार टेबल आहेत. यासाठी ९ कर्मचारी, ५ निवडणूक अधिकारी आहेत.
(edited by- pramod sarawale)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.