Nasser Siddiqui,  Pradeep Jaiswal
Nasser Siddiqui, Pradeep Jaiswal 
मराठवाडा

औरंगाबाद मध्य : प्रतिनिधीवरून वादावादी, पोस्टल मतमोजणी सुरवात | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मध्य मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत असली तरी प्रमुख टक्कर शिवसेना आणि एमआयएममध्ये आहे. खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मारहाण झाल्यानंतर या मतदारसंघाकडे सगळ्यांची नजर असून, या मतदारसंघात पोस्टल मतमोजणीस सुरवात झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद मध्य मतदारसंघात उमेदवारांच्या प्रतिनिधीवरून वादावादी झाली. अपक्ष उमेदवार कीर्ती शिंदे यांचे दीर संदीप यांनी आक्षेप घेतला. त्यावरून शिवससेनेने वाद घालला. त्यामुळे मतदान केंद्रात गोंधळ उडाला. शिवाय शिवसेनेचे प्रतिनिधी जास्त असल्यामुळे इतर शिंदे यांनी आक्षेप घेतला. 

या मतदारसंघात मतविभाजन होऊ नये यासाठी शिवसेना-भाजप यांनी तयारी केली होती. तर राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीत मते विभागली जाणार असल्याने याचा फटका एमआयएमला बसण्याची शक्‍यता आहे. आता शासकीय तंत्रनिकेत येथे मतमोजणी होत असून, दुपारपर्यंत या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेकडून येथे प्रदीप जैस्वाल, एमआयएमकडून नासेर सिद्दिकी, वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ तर राष्ट्रवादीकडून कदीर मौलाना हे मैदानात आहे. एमआयएम आणि शिवसेनेकडून येथे जोर लावण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली होती तर असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदान, पैठण गेट, किराडपुरा येथे सभा घेऊन शहरातील गल्लोगल्लीत पदयात्रा केल्या होत्या.त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
 
औरंगाबाद मध्य मतदारसंघाची अशी आहे पार्श्‍वभूमी 
मतदारसंघ पुरनर्रचनेत सन 2009 विधानसभा निवडणुक हा मतदारसंघ अस्तित्वा आला. त्यावेळी शिवसेनेत असलेले प्रदीप जैस्वाल यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करुन मैदानात उडी घेऊन विजय मिळविला होता. त्यावेळी प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे कदीर मौलाना, शिवसेनेचे विकास जैन यांच्यात तिरंगी लढत झाली होती. प्रदीप जैस्वाल यांना 49 हजार
935, राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांना 41 हजार 583 तर शिवसेनेचे विकास जैन यांना 33 हजार 988 मते मिळाली होती. 

2014 मध्ये शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काडीमोड होऊन सर्वच पक्ष मैदानात उतरले होते. यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळविला होता. इम्तियाज जलील यांना 61 हजार 841 मते मिळाली होती त्याखालोखाल शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 41 हजार 831, भाजपचे किशनचंद तनावणी 40 हजार 770 तर राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांना 11 हजार, 842 मते मिळाली होती.  या मतदारसंघात शहरातील जुना भाग आणि नवीन असा दोन्ही भाग येत असल्याने यामध्ये हिंदु, मुस्लिम, दलित समाजाची मते निर्णायक आहे. यामध्ये मुस्लिम समाजाची मते ही मोठ्या संख्येने असल्याने 2014 च्या मतविभाजनात येथे एमआयएमचा उमेदवार विजयी झाला होता. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT