जलदूत संग्रहित 
मराठवाडा

जलदूत च्या बिलाचा लातूर महापालिकेला झटका

हरी तुगावकर

लातूरः  लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला आहे. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे "जलदूत'चे बिल घेतले जाणार नाही, अशी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. आर्थिकदृष्ट्या "आयसीयू'मध्ये असलेल्या महापालिकेला आता हे बिल कसे भरायचे, असा प्रश्न पडला आहे. 

मांजरा धरण कोरडे पडल्यानंतर एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत "जलदूत'ने मिरज ते लातूर खेपा मारून नागरिकांची तहान भागवली होती. रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्याने लातूरची त्यावेळी देशभर चर्चा झाली होती. यंदाही सप्टेंबर सुरू झाला तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. जलस्रोत कोरडेच आहेत. उर्वरित दिवसांतही पाऊस झाला नाही, मांजरा धरण भरले नाही तर मिरज, पंढरपूर व उस्मानाबादहून रेल्वेने पाणी आणता येते का, याची प्रशासनाने पुन्हा चाचपणी सुरू केली आहे. त्यातच रेल्वेने 11 कोटी 80 लाख 88 हजार 625 रुपयांच्या मागील बिलाची नोटीस दिली आहे. काही संस्थांनी परस्पर काही बिल भरल्याने महापालिकेकडे नऊ कोटी 90 लाख 30 हजार 518 रुपयांची मागणी रेल्वेने केली आहे. 

मुंबईकरांनी दिली परस्पर काही रक्कम 
रेल्वेने पाणी आल्याचे बिल द्यायचे असते हे महापालिका विसरून गेली होती; पण बॉंबे चेंबर्स ऑफ कॉमर्सने एक कोटी 87 लाख 76 हजार 300 रुपये परस्पर रेल्वेला भरले आहेत. तसेच एका स्वयंसेवी संस्थेने दोन लाख 89 हजार 634 रुपये या बिलापोटी रेल्वेला दिले आहेत. याची महापालिकेला कल्पनाही नाही. रेल्वेने पाठवलेल्या नोटीसमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केल्याने महापालिकेलाही ही माहिती मिळाली आहे. 

"मोफत'च्या घोषणेचे काय? 
रेल्वेने पाणीपुरठा सुरू असताना रेल्वेने पहिल्यांदा चार कोटी रुपयाचे एक बिल महापालिकेला दिले होते. त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूरला रेल्वेने मोफत पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तेथेच हा विषय थांबला. महापालिकेलाही हायसे वाटले. रेल्वेनेही नंतर पत्रव्यवहार केला नाही. आता पुन्हा लातूरला "जलदूत'ची गरज लागणार आहे, हे लक्षात येताच पूर्वीच्या बिलाची नोटीस दिली आहे. त्यामुळे महापालिकेला झटका बसला आहे. राज्य शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आता व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT