Rain Damages Onion Crop esakal
मराठवाडा

Osmanabad | पावसाचा कांदा उत्पादकांना फटका, मोठे आर्थिक नुकसान

साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसतोडीसाठी आलेल्या व उसाच्या फडात राहत असलेल्या ऊसतोड कामगारांचे मोठ्या प्रमाणात पावसामुळे हाल होत आहेत.

आनंद खर्डेकर

परंडा (जि.उस्मानाबाद) : ऋतु बदलले, महिने बदलेले तरी पावसाची हजेरी कायमच आहे. वातावरणात कायम बदल (Osmanabad Rain) होत आहे. थंडीच्या दिवसात पावसाच्या सरी कोसळत आहेत. झोपताना थंडी, उठताना पाऊस असे चित्र पाहावयास मिळत आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र पावसाची वेळ चुकल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उडीद, मुग या कमी दिवसाच्या पिकांत अनेक दिवस पाणी राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने परिसरातील सर्वच प्रकल्प भरल्याने शेतकरी सुखावला असला तरी वेळी-अवेळी येणाऱ्या पावसामुळे मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालले आहे. या पावसाचा द्राक्ष बागांना (Grapes Garden) मोठ्या (Paranda) प्रमाणात फटका बसला आहे. तर साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसतोडीसाठी आलेल्या व उसाच्या फडात राहत असलेल्या ऊसतोड कामगारांचे (Onion Crop) मोठ्या प्रमाणात पावसामुळे हाल होत आहेत. (Marathwada)

या अवकाळी पावसाचा फटका शेकडो कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतात सडून चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसामुळे रस्ते खराब होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे तालुका परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT