file photo 
मराठवाडा

Video : 'या' आजारामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्‍यक

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी, अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी प्रकारच्या व्याधी असतात. 

ज्येष्ठांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक, आर्थिक आणि वैद्यकीय स्थिती हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेकंड इनिंग आनंदी व सुखात जावी, तसेच त्यांची घरात घुसमट होऊ नये, यासाठी प्रत्येक शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळे, संघ कार्यरत आहेत. त्यात आप्तस्वकियांनी दूर लोटलेल्या वृद्धांना मानसिक आधार दिला जातो. वास्तविक पाहता संयुक्त कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अडचणीच्या काळात मुलाला त्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र, अनेक मुलांना बापाची लुडबुड नको असते. वास्तविक पाहता ज्येष्ठांचा अनुभव लक्क्षात घेता त्यांचा सल्ला निमुटपणे ऐकूण घ्यायला पाहिजे. तरच बाप आणि मुलाच्या नात्यातील गोडवा कायम राहू शकतो.  

लॉकडाउनमध्ये ज्येष्ठांची काळजी आवश्‍यकच
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लाॅकडाउन आणि संचारबंदीसारख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.  वाढत्या वयासोबत निमोनिया होणे ही सामान्य गोष्ट आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने ज्येष्ठांना हा आजार होऊ शकतो. डायबिटीजच्या ज्येष्ठ रुग्णांना ही समस्या होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते. त्यासाठी ज्येष्ठांना वेळेवळ सकस आहार, गोळ्या तसेच त्यांच्या व्यायामाकडे लक्ष्य देण्याची आज गरज आहे.

पूर्वी कुटुंबात ज्येष्ठांचे स्थान होते महत्त्वाचे
भारतात पूर्वी कृषी प्रधान अर्थव्यवस्थेत ज्येष्ठांचे स्थान महत्त्वाचे होते. त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जात होता. त्यांचे ज्ञान, अनुभव हे ज्ञानकोश, मार्गदर्शक समजले जात. संयुक्त कुटुंबात त्यांचा भीतीयुक्त आदर असे. ज्येष्ठ जाती पंचायतीचा सदस्य असे ते न्यायदानाच्या कामात मदत करत. गावचा कारभार ज्येष्ठांच्या उपदेशाने चालत असे. भारतीय पारंपारिक जीवनात ज्येष्ठांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती. ते सामाजिक जीवनात वंदनीय होते.

ज्येष्ठांच्या समस्या झाल्यात जटील
भारतीय समाजात ज्येष्ठांची सांभाळ करणारी पारंपारिक व्यवस्था होती. त्यामुळे ज्येष्ठांचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर भारतीय समाजात जो आमूलाग्र बदल होऊन शहरीकरण, औद्योगिकरणाची प्रक्रिया दृढमूल झाली. त्यातून संयुक्त कुटुंब, नातेवाईकांचा गट, धार्मिक संस्था प्रभावित झाल्या. ज्येष्ठांच्या कल्याणात शतकानुशतके अग्रेसर असणाऱ्या या संस्था विघटीत होऊ लागल्या. नवी सामाजिक मूल्ये, व्यक्तीवादी विचारसरणीचे प्रचलन झाले. यातूनच कुटुंबात ज्येष्ठांची अडचण भासू लागली . ज्येष्ठांनी वेगळे रहावे. आमच्या कुटुंबात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी होऊ लागली. परिणामी ज्येष्ठांच्या समस्या अधिकच जटील होत चालल्या आहेत.

ज्येष्ठांनी कुटुंबात रहाताना नातवंडांबरोबर खेळले पाहिजे. सदस्यांसोबत संवाद साधला पाहिजे. सदस्यांनीही ज्येष्ठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वेळ घालवण्यासाठी महिलांनी कादंबऱ्या वाचाव्यात, उन्हाळ्यातील वाळवणाची कामे करावीत. असे नियोजन केले तरच आनंदी जीवन जगता येणे शक्य होईल.                                                       - भागीरथी बच्चेवार, सचिव (ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT