उस्मानाबाद पाऊस.jpg 
मराठवाडा

कहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात !  

वैभव शितोळे

नायगांव (उस्मानाबाद) : गेल्या छत्तीस तासापासून नायगाव (ता. कळंब) परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सहा गांवातील नागरिकांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. वीज नसल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सहा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
नायगांवसह पाडोळी, वडगांव, वाठवडा, पिंपरी (शि) येथील सहा गांवाला पाडोळी येथील सबस्टेशन मधुन विज पुरवठा केला जातो. मंगळवारी (ता.१३) मध्यरात्री खंडीत झालेला विज पुरवठा अजूनही सुरुळीत न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. 

मोबाईल, पाणी बंद
छत्तीस तासापासून वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे येथील मोबाईल टॉवर बंद आहेत. यामुळे मोबईलची रेंज देखील गायब झाली आहे. सर्वांचेच मोबाईल चार्जिंग अभावी बंद आहेत.पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रना बंद आहेत. एकुनच विजे अभावी अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत. यावरून महावीतरणचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. 

महावितरणने लवकरात लवकर  याकडे लक्ष देऊन त्वरित वीजपुरवठा सुरूळीत करावा अशी मागणी सहा गावातील नागरिक करत आहेत.गेल्या दोन दिवसा पासून महवितरणचे अधिकारी परीसरात बिगाड कुठे झाला यासाठी  फिरत आहेत. पण सतत येणा-या पावसाच्या सरीमुळे त्यांना अडथळा येत आहे. अशी माहीती लाईनमेन भिमराव लोकरे यांनी दिली  या संदर्भात वरीष्ठ अधिका-यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT