File photo 
मराठवाडा

सोयाबीनचा दर्जा घसरला : कशामुळे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ८० टक्के सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. त्याचा परिणामसोयाबीनच्या दर्जावर झाला. परिणामी हमीभाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा आहे. दोन्ही राज्यात खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. एकेकाळी कापूस उत्पादकांचा भाग म्हणून विदर्भ व मराठवाड्याची ओळख होती, मात्र गेल्याकाही वर्षापासून शेतकरी कापूस ऐवजी सोयाबीनकडे वळले आहेत. परिणामी सोयाबीनच्या पेऱ्यात प्रचंड वाढ झाली आहे. 

अवकाळी पावसाचा फटका
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला दमदार पाऊस कोसळल्याने सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. सोयाबीनचे भरघोस व दर्जेदार उत्पादन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐन सोयाबीन सोंगणीच्या काळात परतीचा व त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. त्यामुळे शेतातील सोयाबीनचे उभे पीक काढायलाही वेळ मिळाला नसल्याने ते खराब झाले.

सोयाबीनला हमीभाव नाहीच
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले. मात्र त्याचा दर्जा राखता आला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीन दाणे काळे व लहान झाले. सुमारे ८० टक्के सोयाबीनचे दर्जाहीन उत्पादन झाले. केंद्र शासनाने सोयाबीनला तीन हजार ७१० रुपये हमीभाव जाहिर केला. सोयाबीनच्या उत्पादीत मालाचा दर्जाच नसल्याने बहुतांश मालाला हमीभाव मिळाला नाही.  

भाववाढीच्या अपेक्षेने साठवणूक
सोयाबीनला अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षा असल्याने चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयसह स्थानिक बाजार पेठेत दरवाढ झाल्यावर ते सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत येण्याचा अंदाज आहे.
- गजानन कार्लेवार (व्यापारी)
 
सोयाबीन तेलाच्या भावात भडका
सोयाबीनच्या दर्जाहीन उत्पादनाचा फटका तेलाच्या उत्पादनावर झाला. तेल उत्पादक कंपन्यांना दर्जेदार सोयाबीनचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या भावाचा चांगलाच भडका उडाला आहे. किलो मागे सोयाबीनचे तेल 15 ते 20 रुपयांनी महागल्याने ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
- शशिकांत जायभाये (ज्येष्ठ नागरिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : पहिला डाव संपला, MS Dhoni मैदानावर आला... CSK च्या खेळाडूंनी जे केलं, ते पाहून सारेच Emotional... 'माही'ची निवृत्ती?

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

SCROLL FOR NEXT