File photo
File photo 
मराठवाडा

सोयाबीनचा दर्जा घसरला : कशामुळे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ८० टक्के सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. त्याचा परिणामसोयाबीनच्या दर्जावर झाला. परिणामी हमीभाव मिळत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा आहे. दोन्ही राज्यात खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. एकेकाळी कापूस उत्पादकांचा भाग म्हणून विदर्भ व मराठवाड्याची ओळख होती, मात्र गेल्याकाही वर्षापासून शेतकरी कापूस ऐवजी सोयाबीनकडे वळले आहेत. परिणामी सोयाबीनच्या पेऱ्यात प्रचंड वाढ झाली आहे. 

अवकाळी पावसाचा फटका
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला दमदार पाऊस कोसळल्याने सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. सोयाबीनचे भरघोस व दर्जेदार उत्पादन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐन सोयाबीन सोंगणीच्या काळात परतीचा व त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. त्यामुळे शेतातील सोयाबीनचे उभे पीक काढायलाही वेळ मिळाला नसल्याने ते खराब झाले.

सोयाबीनला हमीभाव नाहीच
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले. मात्र त्याचा दर्जा राखता आला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीन दाणे काळे व लहान झाले. सुमारे ८० टक्के सोयाबीनचे दर्जाहीन उत्पादन झाले. केंद्र शासनाने सोयाबीनला तीन हजार ७१० रुपये हमीभाव जाहिर केला. सोयाबीनच्या उत्पादीत मालाचा दर्जाच नसल्याने बहुतांश मालाला हमीभाव मिळाला नाही.  

भाववाढीच्या अपेक्षेने साठवणूक
सोयाबीनला अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षा असल्याने चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयसह स्थानिक बाजार पेठेत दरवाढ झाल्यावर ते सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत येण्याचा अंदाज आहे.
- गजानन कार्लेवार (व्यापारी)
 
सोयाबीन तेलाच्या भावात भडका
सोयाबीनच्या दर्जाहीन उत्पादनाचा फटका तेलाच्या उत्पादनावर झाला. तेल उत्पादक कंपन्यांना दर्जेदार सोयाबीनचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या भावाचा चांगलाच भडका उडाला आहे. किलो मागे सोयाबीनचे तेल 15 ते 20 रुपयांनी महागल्याने ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
- शशिकांत जायभाये (ज्येष्ठ नागरिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT