सोयाबीन sakal
मराठवाडा

सरकारच्या आयाती धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांवर संकट

आयातीच्या धोरणामुळे दरावर होणार परिणाम

आनंद खर्डेकर

परंडा (जि. उस्मानाबाद) : शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने इतर सोयाकेकच्या आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा परिणाम दरावर होणार असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

आर्थिक अडचणीवर मात करून मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला भाव नसल्याने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. पावसाने गरजेच्या वेळी धोका दिल्याने खरिपाच्या उत्पादनावरही परिणाम होऊन याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.

पाऊस नसल्याने सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला असून, पुढील उत्पादनाचीही शेतकऱ्यांना खात्री नाही. हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, लिलावात दोन ते चार रुपये किलोने विकली जात आहे. लाल टोमॅटोला भावच नसल्याने उत्पादकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे व कवडी मोल बाजारभावामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असतानाच सोयाबीन उत्पादकांनाही अडचणीत आणण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

केंद्र सरकारने सोयाकेकच्या आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली. देशातील सोयाबीन बाजारात येणार तेव्हाच आयातीचा माल देशात येणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा फटका बसणार आहे.

मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. केंद्रसरकारने सोयाकेक आयात करण्याचा निर्णय घेताच दोन हजार रुपयांनी सोयाबीनचे भाव उतरले आहेत. कोरोनामुळे शेतीमाल मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली असतानाच आयातीचा केद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. - शंकर घोगरे शेतकरी, कंडारी, ता. परंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT