latur lockdown
latur lockdown latur lockdown
मराठवाडा

Latur Lockdown Updates: अखेर लातूर जिल्ह्यात सहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोनाला (covid 19) रोखण्यासाठी सरकारने राज्यात शनिवारी (ता. १५) सकाळी सातपर्यंत लॉकडाउन (lockdown) लागू केला आहे. मात्र, या लॉकडाउनचा लोकांवर काहीच परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सकाळी सात ते अकरा दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत दिलेल्या काळात तर लोकांची तोबा गर्दी होत आहे. यातूनच लॉकडाउनचा प्रभाव कमी जाणवत असल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यात शनिवारपासून (ता. आठ) सहा दिवसांचा कडक लॉकडाउन लागू केला आहे.

गुरुवारपर्यंत (ता. १३) हा लॉकडाउन असणार असून, वीकेंड लॉकडाउनप्रमाणेच या काळात कडक निर्बंध लागू असणार आहेत. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या कमी करण्यासाठी सरकारने सुरुवातीला आठवड्यातून शनिवारी व रविवारी दोन दिवस वीकेंड लॉकडाउन लागू केला होता. त्यानंतर वीकेंड लॉकडाउन बंद करून ३० एप्रिलपर्यंत व त्यानंतर १५ मेपर्यंत कडक निर्बंधाचा लॉकडाउन लागू केला. या लॉकडाउनमध्ये केवळ सकाळी सात ते अकरा या काळातच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करता येणार होती.

वीकेंड लॉकडाउनमध्ये मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता व या वस्तूंची घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) देण्यास परवानगी होती. जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच घराबाहेर पडण्याची मुभा वीकेंड लॉकडाउनमध्ये आहे. अन्य व्यक्तींना बाहेर पडता येत नव्हते. मागील वीस दिवसापासून लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये लोकांचा वावर वाढल्याने या लॉकडाउनपेक्षा वीकेंड लॉकडाउनचा प्रभाव अधिक असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सरकारने नव्या लॉकडाउनमुळे बंद केलेला वीकेंड लॉकडाउन जिल्ह्यात तसाच पुढे चालू ठेवला होता.

नियमित लॉकडाउनपेक्षा जिल्ह्यात या वीकेंड लॉकडाउनचा प्रभाव दिसत होता. नियमित लॉकडाउनमध्ये निर्बंध असतानाही नागरिक बिनधास्त फिरू लागले. कोरोना संसर्गाची कसलीही भीती न बाळगता त्यांचा मुक्त वावर सुरू होता. सकाळच्या सात ते अकरा दरम्यानही खरेदीसाठी थोडीही काळजी किंवा सुरक्षा उपाययोजना न करता लोकांची गर्दी वाढली. मागील काही दिवसांतील ही परिस्थिती व वीकेंड लॉकडाउनचा प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी शनिवारपासून सहा दिवसांचा वीकेंडसारखा लॉकडाउन जिल्ह्यात लागू केला आहे. वीकेंडसारखेच निर्बंध असल्याने लॉकडाउनचा अधिक प्रभाव दिसून येण्याची आशा प्रशासनाला आहे.

काठी उगारण्याची गरज-
पहिल्या लाटेतील लॉकडाउनमध्ये पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काठीचा चांगलाच प्रसाद दिला होता. अनेकांची धुलाई केली होती. यामुळे बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांची धास्ती होती. दुसऱ्या लाटेतील लॉकडाउनमध्ये पोलिसांचे हात बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. यातूनच विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिस जुजबी चौकशी करीत असून, त्यांचा दंडात्मक कारवाईवरच जास्त भर दिसून येत आहे. काठीचा वापर बंद झाल्याने लोकांचा मुक्त वावर वाढला आहे. यामुळेच आता पोलिसांनी काठी उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT