file photo
file photo 
मराठवाडा

परभणीत तापमानाने गाठली चाळीशी

कैलास चव्हाण

परभणी : सतत ढगाळ वातावरणामुळे नाहीसा झालेला उष्णतेचा कडाका सुरु झाला आहे. परभणी जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून  उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. रविवारी (ता.१२) तापमान ४० अंशावर राहीले. येत्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याचा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिला.

यंदा ऋतुचक्र बदलले आहे. पावसाळा संपल्यानंतर पाऊस सुरु झालला होता. हिवाळ्यातदेखील थंडी गायब होऊन अधुनमधुन पाऊस पडत होता. आता आर्धा उन्हाळा संपल्यानंतर तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी मार्च महिण्याच्या अखेरच्या आठवड्यात तापमान ४२ अंशावर गेले होते. यंदा मात्र, १२ एप्रील रोजी तापमानाने चाळीशी गाठली आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असूनही पारा वाढला आहे. रविवारी तापमान ४० अंशावर होते. त्यामुळे अंग भाजणारा सुर्यप्रकाश पडत आहे.

उकाडा वाढला
 माणसासोबत प्राणीदेखील हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणि उकाडा यामुळे सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच नागरिक घरात आहेत. त्यामुळे बाहेर उन्हाचा त्रास होत नसला तरी घरात वीजपुरवठा खंडीत होताच प्रचंड उकाडा जाणवत आहे.
कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाअंतर्गत असलेल्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने पुढील पाच दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.


कोट्यवधींची उलाढाल ठप्प
दरवर्षी मार्च महिन्यापासून उन्हाळ्याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होत असते. उन्हापासून बचाव करणाऱ्या साधनांनी बाजारपेठ सजलेली राहाते. बाजारपेठांमध्ये उन्हापासून संरक्षण करणाऱ्या सनगॉगल्स, टोपी, रुमाल आदी वस्तूंची गर्दी होते. याबरोबरच विविध शीतपेयांची दुकाने लागतात, सर्वच रस्त्यांवर रसवंत्या सुरू असतात. कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक दुकानांतदेखील गर्दी होते. फ्रीज, एअर कूलर, फॅन यांनाही मागणी होऊ लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी टाकीची गरज असल्याने सध्या पाण्याच्या टाक्यांचीदेखील विक्री वाढते. अशी एकदंरीत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल वाढते. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्याचा परिणाम या सर्व गोष्टींवर झाला आहे. उकाडा वाढू लागल्याने पंखे, कूलरची गरज आहे. ज्यांच्याकडे कूलर आहेत, त्यांनी ते सुरू केले आहेत. मात्र, अनेकांचे कूलर नादुरुस्त झालेत. कुणाला नवीन कूलर घ्यायचे, कुणाचा पंखा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT