file photo
file photo 
मराठवाडा

नांदेडमधील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी, तसेच सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर जाहीर झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाल्याने यंदा पीकविमा मंजूर होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


राज्यातील कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यात येते.


सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर जाहीर करण्यात
शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ता. ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर जाहीर करण्यात आली. यानंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते.


तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राजकीय, तसेच शेतकरी संघटनांकडून पैसेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर करण्याची मागणी केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यामुळे यंदा खरीप पीकविमा मंजूर होइल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.


अंतिम पैसेवारी निश्‍चित करण्यात आली
जिल्ह्यातील एकूण एक हजार ५६२ गावांतील सात लाख ६६ हजार ६०५ हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी सात लाख २० हजार १०६ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्‍चित करण्यात आली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे.

तीन टप्प्यांत पैसेवारी
दरवर्षी हंगामी पैसेवारी ता. ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर; तर अंतिम पैसेवारी ता. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ता. तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी
(पैसेवारी पैशात)
नांदेड - ४४, अर्धापूर - ४८, कंधार - ४८, लोहा - ४८, भोकर - ४८, मुदखेड - ४७, हदगाव - ४८, हिमायतनगर - ४७, किनवट - ४७, माहूर - ४७, देगलूर - ४७, मुखेड - ४७, बिलोली - ४८, नायगाव - ४८, धर्माबाद - ४८, उमरी - ४७.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT