korona.jpg
korona.jpg 
मराठवाडा

कोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना

विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली) : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे. डिग्रस (ता. कळमनुरी) येथे तर पुणे येथून आलेल्या सूर्यवंशी कुटुंबीयांना गावकऱ्यांनी पाणी देण्यासही नकार दिला. त्यामुळे पाण्याअभावी चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, केंद्रप्रमुख बालाजी गोरे, तलाठी व ग्रामसेवकांनी गावाला भेट देऊन पाणीप्रश्न सोडविण्यास मदत केली.

दिग्रस (ता. कळमनुरी) येथील अंतोष सूर्यवंशी यांची बहीण दुर्गा वाकळे व भावजी भगवान वाकळे हे मुळशी (जि. पुणे) येथे कामानिमित्त राहतात. महिन्यापूर्वी श्रीमती दुर्गा वाकळे यांची प्रसूती झाली. त्यानंतर श्रीमती वाकळे व त्यांच्या आई उज्ज्वला सूर्यवंशी या गुरुवारी (ता. १४) सकाळी डिग्रस येथे आल्या. 

पाणी घेण्यास मज्जाव

त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना विलगीकरण कक्षात थांबण्यास सांगितले. मात्र, नेमके थांबावे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्यानंतर बालाजी सूर्यवंशी यांनी त्यांना घरी नेले. घरी जाताना त्यांनी एका हात पंपावरून पाणी भरून घेतले. मात्र, शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी त्यांना हातपंपावरून पाणी घेण्यास मज्जाव केला. 

महसूलच्या कर्मचाऱ्यांची धाव

त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबीय अडचणीत सापडले. सकाळपासून पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे श्री. सूर्यवंशी कुटुंबीय व त्यांची बहीण दुर्गा वाकळे यांचे चांगलेच हाल झाले. गावकरी पाणी भरू देत नसल्याने श्री. सूर्यवंशी यांनी आखाडा बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी देविदास गायकवाड यांना गावात पाठविले. 

हातपंप दुरुस्त करून देण्यात आला

श्री. गायकवाड यांनी गावात पाहणी केल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दोन हंडे पाणी देण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी तातडीने गावात भेट दिली. त्यानी गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर श्री. सूर्यवंशी कुटुंबीयांसाठी परिसरातील हातपंप दुरुस्त करून देण्यात आला असून त्यांना पाणी देण्यात आले. दरम्यान, डिग्रस येथील सरपंचाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी सोडविला पाणीप्रश्न

केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांचे डिग्रस हे गाव आहे. आपल्या गावामध्ये हा प्रकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. गोरे यांनी आखाडा बाळापूर येथून दोन कॅनमध्ये पाणी भरून घेतले. तसेच कुरुंदा येथील मित्रालाही दोन कॅन भरून पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर हे पाणी श्री. सूर्यवंशी कुटुंबाला देण्यात आले. श्री. गोरे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली. त्यानंतर श्री सूर्यवंशी कुटुंबीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT