file photo
file photo 
मराठवाडा

पोलिसांना मिळेना पाणी, औरंगाबादेत असे का होतेय?

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयाशेजारी पोलिसांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, 750 घरांना अद्याप पाणीच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या घरांसाठी नळ मिळावेत म्हणून सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी (ता. 15) थेट महापालिकेत धाव घेतली. महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन त्यांनी पाण्याची मागणी केली. त्यावर तातडीने नळ कनेक्‍शन देण्याचे आदेश महापौरांनी दिले. 

पोलिसांसाठी घरे बांधण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली होती. त्यातून पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात बहुमजली घरे बांधण्यात आली. यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. या ठिकाणी 750 घरे बांधण्यात आली आहेत. त्यात पोलिस कर्मचारी कुटुंबासह राहण्यास गेले. मात्र पाण्याची सुविधा नसल्यामुळे त्यांना भटकंती करावी लागत आहे.

महापालिकेने एकच नळ कनेक्‍शन दिले असून, हे पाणी एवढ्या मोठ्या वसाहतीसाठी पुरत नाही. त्यामुळे नवीन नळ कनेक्‍शन मिळावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात होता. नेहमीप्रमाणे महापालिका अधिकारी दखल घेण्यास तयार नसल्याने अखेर सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी महापालिका कार्यालय गाठले. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन नळ कनेक्‍शन देण्याची मागणी केली.

महापौर घोडेले यांनी दखल घेत तत्काळ नळ देण्याचे आदेश प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांना दिले. महापौरांच्या आदेशानंतर तरी पोलिस आयुक्तालयातील नव्या 750 घरांना पाणी मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT