file photo
file photo 
मराठवाडा

Video : फळबागेचे पाणी तोडून भागविली गावाची तहान

गणेश पांडे

परभणी : डोक्यावर घोंगावणारे कोरोनाचे संकट, त्याच बरोबरीने आलेले पाणीटंचाईचे सावट. या दुहेरी संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या जांब (ता. परभणी) सर्कलचे सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील यांनी चक्क त्यांची फळबागेचे पाणी तोडून तेच पाणी गावकऱ्यांसाठी दिले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्यांचा हा उपक्रम विनाखंड सुरू आहे.

जांब (ता., जि. परभणी) या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी आहेत. परंतु, यंदा या दोन्ही विहिरींचे पाणी आटले आहे. त्यामुळे गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी भर उन्हाळ्यात या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माजी खासदार ॲड. तुकाराम रेंगे पाटील यांचे सुपुत्र तथा परभणी जिल्हा परिषदेच्या जांब सर्कलचे सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील यांना गावकऱ्यांच्या समस्या समजली. त्यांनी तातडीने त्यांचे चुलते ज्ञानोबा रेंगे यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना पाणी देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या शेतातील दोन विहिरीचे पाणी एका ठिकाणी आणले आहे. गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात त्यांनी एक मोठी लोंखडी टाकी बसवून त्यात या दोन्ही विहिरींचे पाणी सोडले आहे. या टाकीतील पाणी १८ नळांद्वारे लोकांना दिले जात आहे.

तीन वर्षांपूर्वी सुरू केला उपक्रम
तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ पडला होता. तेव्हा गावातील सर्व विधंन विहिरी आटल्या होत्या. भारत निर्माण योजनेतील विहिरीलादेखील पाणी नव्हते. गावकऱ्यांचे हाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बाळासाहेब रेंगे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवरून गावापर्यंत पाइपलाइन अंथरून पाणी आणले होते. तेव्हापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उन्हाळ्यात पाणी जास्त लागत असल्याने आता त्याच्या गावाजवळी शेतात पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे.

दररोज चार तास पाणी
या ठिकाणावरून गावकऱ्यांसाठी उन्हाळ्यात दररोज चार तास पाणी सोडले जाते. दुपारी चार वाजता पाणी वाटपाची सुरवात होते. हळूहळू गावकऱ्यांची या ठिकाणी गर्दी जमते. ते सांयकाळी सात वाजेपर्यंत पाणीपुरविले जाते. पाण्यासाठी गावातील महिला, मुल व पुरुषाची सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दी जमत असते.


दररोज ७० हजार लिटर पाणी वाटप
उन्हाळ्याची दाहकता वाढत जाते. त्यामुळे गावकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. दररोज ७० हजार लिटर पाण्याचे वाटप या माध्यमातून केले जाते.
- बाळासाहेब रेंगे पाटील, सदस्य, जिल्हा परिषद, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT